मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी ही “जुळून येती रेशीमगाठी” या मालिकेतून घराघरांमध्ये लोकप्रिय झाली. प्राजक्ताने अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. प्राजक्ता माळीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे म्हणजेच फॅन बेस आहे. प्राजक्ताला अनेकदा तिच्या सोशल मीडिया वरून अनेकदा कमेंट आणि प्रपोज येत असतात. आता तिला अशाच एका शेतकरी मुलाने पत्र लिहून थेट लग्नाची मागणी घातली आहे. चला तर पाहूया नेमकं त्या शेतकरी मुलाने प्राजक्ताला काय मागणं घातलं आहे.
गेल्या काही दिवसातच प्राजक्ताने जयंती वाघधरेच्या ‘ आम्ही असं ऐकले’ या पॉडकास्ट ला हजेरी लावली होती. या पॉडकास्ट मध्ये प्राजक्ता माळीने स्वतः लग्न करायचं असल्याची इच्छा बोलून दाखवली आहे. एवढेच नाही तर प्राजक्ता लग्न करण्यासाठी तयार असल्याचे देखील तिने सांगितलं आहे. हे सांगत असताना प्राजक्ताने त्या शेतकरी मुलाच्या पत्राचा किस्सा देखील या फोटो कास्ट मध्ये सांगितला आहे.
” प्राजक्ता म्हणते की मी आता आईला माझ्यासाठी मुलगा शोधण्यात ची परवानगी दिली आहे, आणि आता आईला खरंच दोन पत्र देखील आली आहेत आणि मला ती इतकी आवडली आहेत की मला वाटते की खरच त्यांना फोन लावावा असं प्राजक्ता माळी म्हणत आहे.
पुढे प्राजक्ता माळी असं म्हणत आहे की, ” त्यातील एका पत्रामध्ये त्यांनी खूपच प्रेमाने म्हटले की मी एक शेतकरी आहे, मला माहिती आहे की मी खूप वेगळ्या लेवल मध्ये बोलतोय. तुमचं प्रोफेशन हे माझ्या प्रोफेशन पेक्षा खूप वेगळा आहे. पण, मला हे सांगायचं आहे की मी शेतकरी आहे आणि कायम शेतकरीच राहणार आणि जर तुम्हाला आवडणार असेल तर तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहे का?
त्यावर प्राजक्ता म्हणते की हे मला इतका आवडले की मी म्हटले की हा किती गोड आहे, आधी मी या सर्व गोष्टींसाठी तयार नव्हते. लग्न म्हणजे मला डोकेदुखी वाटायची, पण आता मी आईला सांगितले तू माझ्यासाठी मुलगा शोधूनच आण म्हणून. प्राजक्तामध्ये मला पाहायचा आहे माझा होणारा नवरा कोण आहे तो मुलगा… आणि आता मी या सर्वांसाठी तयार आहे”.
प्राजक्ता लग्न करण्यासाठी आता खूप उत्सुक झाल्याचं या पॉडकास्ट मधून दिसून आले आहे, त्यामुळे आता थोड्या दिवसातच प्राजक्ता ही लग्न बंधनात अडकणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.